चंद्रपूर : - ओबीसीची जातीय जनगणना झाली पाहिजे ,शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे ,ओबीसीच्या सर्व रिक्त पदभरती करण्यात यावी, खाजगीकरण तसेच कंत्राटी पद्धत भरती बंद करावी ,स्वामीनाथन आयोग लागू करावा, केंद्र व राज्य शासनाने केजी व पीजी ची शिक्षण व्यवस्था निशुल्क करावी, शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी करावी, महा ज्योती संस्थेस पंधराशे कोटी रुपयांच्या निधी तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशा अनेक मागण्या घेऊन माननीय डॉ सुरेश वर्षे श्री राजेश काकडे एडवोकेट अंजली साळवे यांचे नेतृत्वाखाली ओबीसी जागर यात्रा विदर्भात काढण्यात आली या यात्रेचे चंद्रपूर येथे आगमन होताच शिव ब्रिगेड संघटना व राष्ट्रीय कुणबी महासंघा द्वारे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले यावेळी राष्ट्रीय कुणबी महासंघाचे डि के आरिकर सर शिवब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष सतीश मालेकर धनोजे कुणबी समाज मंडळाचे सचिव अरुणजी देऊळकर, कोषाध्यक्ष अरुणजी मालेकर, नवनाथ जी देरकर, वसंत बल्की ,निळकंठ पावडे ,अरुणजी धानोरकर, सुधीर कोरडे, मनोहर जाधव उपस्थित होते