पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक



 भद्रावती :- नजीकच्या काळात येत असलेले मोहरम व इतर सण लक्षात घेता शहरात सामाजिक सुव्यवस्था कायम रा हून हे सण आनंदात साजरे व्हावे, त्याचप्रमाणे शहरात या काळात कोणतेही अनुचित घटना घडू नये, यासाठी भद्रावती पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली.
या बैठकीत ठाणेदार गोपाल भारती यांनी शहरातील सर्व समाज बांधवांना शहरात शांतता राखण्याचे आवाहन करीत काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये, समाजा समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य करू नये. काही असामाजिक तत्व शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आल्यास त्याची माहिती त्वरित पोलीस स्टेशनला कळवावी. सोशल मीडियावर अनुचित वक्तव्य पोस्ट करू नये किंवा अशा पोस्ट इतरत्र फॉरवर्ड करू नये, असे आवानही यावेळी ठाणेदार गोपाल भारती यांनी केले. सदर बैठकीला नगराध्यक्ष अनिल धानोरकर, नगरसेवक निलेश पाटील, चंद्रकांत खारकर, राजू गैणवार, शेख रबबानी, उमेश रामटेके, सुरज गावंडे, सुनील बिपटे, पिंटू मडावी, डॉ. राकेश तिवारी, शिवाजी कोंबे, संदीप कुंमरे, जावेद शेख, जितेंद्र मरसकोल्हे आदीची उपस्थिती होती.
Post a Comment (0)
Previous Post Next Post